Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)

Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

AYUSHonline

AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in

ayush - adivasi yuva shakti

Saturday, June 27, 2009 AYUSH | Adivasi Yuva Shakti 0 comments






नमस्कार मित्रानो....

आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...
आयुष - आदिवासी युवा शक्ति

आज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...

कार्यक्रमाचे तपशील -
व्यवसाय मार्गदर्शन शिबीर
ठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रह
दिनांक - २८ जून २००९
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५


आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्क
डॉ. सुनील पर्हाड (doctor, REL)  -09860383632
वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887
विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत
 

-आयुष मंच


**********************************************************************************************************************************************************************************************

तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti
 
 मी बेस आहू.. तू बेस रेहे....     कव्हा येव घरा असा झालाहे...     करमं नाय....     हलू हलू जा निही त पडशील..     मी त अथाचाच र....     आपले सगले एकूच आहुत     होली खेलाया ये दादू...     आठवा नोकों काढू हाव     आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ...     आपले लोकांना विसरजोस नोको हाव ...     कोन्हाला माझा आठव येत होवा का निही...     आपली संस्कृति आपली अस्मिता     क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........     आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. ....     अथ नाचू का कोठं नाचू?     माना आठव येय घराचा....     ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय?     क्या लाजतोस आपली भाषा बोलाया     आलसय आली हे...     आपले लोकाना विसरु नोकोस   कव्हा येव घरा असा झालाहे... आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ... आठवा नोकों काढू हाव मी बेस आहू.. तू बेस रेहे.... होली खेलाया ये दादू... क्या लाजतोस आपली भाषा बोलाया आपली संस्कृति आपली अस्मिता आपले लोकाना विसरु नोकोस क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........ आपले लोकांना विसरजोस नोको हाव ... आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. .... हलू हलू जा निही त पडशील.. करमं नाय.... आपले सगले एकूच आहुत माना आठव येय घराचा.... आलसय आली हे... मी त अथाचाच र.... अथ नाचू का कोठं नाचू? ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय? कोन्हाला माझा आठव येत होवा का निही... तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti **********************************************************************************************************************************************************************************************








--
तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल निही   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti





ayush program @ dahanu, career guidence june 2009

Unknown 0 comments
hi friends....

aaj "ayush" che "career guidence" sathi Dahanu yethe prograam aahe....
venue - dahanu panchayat samiti hall.
date - 28 jun 09
time 10am to 5 pm

please attend same & inform to all your frds.

rgrds

?????? ?????? '?????'????!

Thursday, June 25, 2009 Unknown 0 comments
दुर्गम भागांत 'ज्ञान'वैभव!
     

दहावीच्या परीक्षेत यंदा ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ५९ सरकारी माध्यमिक आश्रम शाळांपैकी आठ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू तालुक्यांत २१६ माध्यामिक शाळा असून यात ५९ सरकारी आश्रमशाळांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील अडोशी, गोंडे बुदुक, कोरेगांव तसेच जव्हार येथील कुपोषित बालकांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वांगणी, विनवल, देहेरे तसेच, विक्रमगड येथील कोन्हे, वाडा तालुक्यातील एक अशा एकूण आठ सरकारी आश्रमशाळांनी १०० टक्के यश मिळविले आहे.

तीन-चार वषेर् या आश्रमशाळांत दहावीचे निकाल शून्य ते २० टक्केच लागत होते. त्यामुळे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकार आदिवासी मुलांना शिक्षण देत असूनही त्याचा पुरेसा लाभ आदिवासींना मिळत नाही; केवळ कागदी घोडे नाचवले जातात, अशी ओरड होत होती. यंदा मात्र चित्र बदलले. केवळ पाच टक्के शाळांचा निकाल ५० टक्यांच्या खाली आला आहे. त्यातही डहाणू तालुक्यातील धामणगाव येथील आश्रम शाळेचा निकाल २२. ७२ टक्के व रानकोळ येथील आश्रमशाळेचा निकाल ३१.०३ टक्के इतकाच आहे.

इंग्रजी शाळांमध्ये केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्याार्थ्यांनाच दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. मात्र आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर अशी सक्ती केली जात नसतानाही आश्रमशाळांनी ही कामगिरी केल्याने या शाळांचे कौतुक होत आहे.
 
original at -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4703878.cms
 

????????? ??????? ????

Unknown 0 comments
करिअरच्या वेगळ्या वाटा

 
           
दहावीचा निकाल लागल्याने आता विद्याथीर् आणि पालकांपुढे असलेला प्रश्ान् म्हणजे कुठलं करिअर निवडायचं. ज्या विद्या
र्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नये. कारण ग्लोबलायझेशनमुळे अनेक करिअर नव्याने उदयाला येत आहेत.

खरंतर या प्रश्ानवर विचार करायची ही योग्य वेळ नाही. झाड चांगलं वाढण्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनातच मुलाच्या करिअरचा विचार करायला पाहिजे.

मूल पाचवीत गेल्यानंतर त्याला कुठल्या विषयात रस आहे हे पालकांनी जाणून घ्यावं. दहावी मुलाच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. म्हणून त्याआधी आपला मार्ग निश्चित करणं आवश्यक आहे.

आपल्या देशात १२० विद्यापीठं आहेत. त्यात चार हजारहून जास्त सीनिअर आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत. कमी गुण मिळूनही पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांदे (पू.) इथल्या खेरवाडीमधल्या र्गव्हन्मेण्ट पॉलिटेक्निक कॉलेज हा चांगला पर्याय आहे. बरेच पालक आपली इच्छा मुलांवर लादतात. प्रत्येक पालकाला आपलं मूल इंजिनिअर व्हावं असं वाटत असतं. पण ७० टक्क्यांपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ नये.

तंत्रज्ञान शाखेची आवड असणाऱ्यांसाठी कम्प्युटर हे क्षेत्र चांगलं आहे. या क्षेत्रात उत्तमोत्तम कोसेर्स आहेत. सध्याच्या काळात नोकरीच्या संधी दुमिर्ळ होत असल्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी जॉब ओरिएण्टेड करिअर्सचा विचार करावा. मोबाइल रिपेअरिंगमध्येही चांगलं करिअर होऊ शकतं. याबरोबरीने टीव्ही, फ्रीज रिपेअरिंगचेही कोसेर्स चांगले आहेत. हे कोर्स केल्यावर तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता आणि चांगलं अर्थार्जन करू शकता. तसंच आयटीआयचे टेक्निकल कोसेर्सही करता येतील.

ग्रामीण भागातले किंवा शेतीची आवड असणारे विद्याथीर् शेतीमध्ये करिअर करू शकतात. त्यासाठी आज महाराष्ट्रात चांगली कॉलेजेस आहेत. पर्यावरणाची आवड असलेल्यांनी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घ्यावा. त्यानंतर पाच वर्षं दापोली, राहुटी, परभणी आणि अकोला इथल्या कृषी विद्यापीठात शिक्षण घेता येईल. यात जमिनीची धूप कशी थांबवावी, तिचा कस वाढवणं यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला पर्यावरणाचा एखादा विषय घेऊन रिसर्चही करता येतो.

ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी 'टॅक्सेशन आणि ऑडिट' हे दोन कोर्स उत्तम आहेत. मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 'टॅक्सेशन आणि ऑडिट'चे चांगले कोसेर्स आहेत. हे कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. प्रत्येक व्यवसायात ऑडिटची गरज भासते. त्यामुळे हा कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. याशिवाय हे विद्याथीर् स्वत:चा व्यवसायही करू शकतात. तसंच नोकरी करतानाच इन्कम टॅक्स भरणं, सोसायटी किंवा इतर आस्थापनांची अकाऊण्ट्स लिहिणं यासारखी खासगी कामंही करू शकतात. परंतु ही कामं करताना १२ वी नंतर तुम्हाला तीन वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम नंतर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

ज्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स अशा शाखांमध्ये फारसा रस नाही त्यांच्यासाठी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अशी वेगळी करिअर्सही खुली आहेत. तुमच्याकडे टॅलेण्ट असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रात स्काय इज लिमिट! तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता किंवा चांगल्या बुटिकमध्ये नोकरीही करू शकता. सध्या या क्षेत्रांचे खासगी संस्थांचे सहा ते आठ महिन्यांचे विविध कोसेर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला कापडाचा पोत ओळखणं, स्टिचिंग करणं, विणणं, डिझायनिंग करणं यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. जोडीला तुमची कल्पकता असल्यास या क्षेत्रात उत्तम यश मिळवता येईल.

जेमॉलॉजी हेही चांगलं करिअर म्हणून उदयाला येतंय. प्राचीन काळापासून माणसाला हिऱ्याचं, खड्याचं आकर्षण आहे. त्यामुळे जगभरात अनेक वर्षांर्पासून रत्नांचा व्यापार सुरू आहे. यामध्ये हिऱ्याला पैलू पाडण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि कौशल्याचा भाग असतो. दहावीनंतर या क्षेत्राची आवड असलेले विद्याथीर् हे कोसेर्स करू शकतात. त्याचा कालावधी साधारणत: सहा महिन्यांचा असतो.

ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आवड नाही ते विद्याथीर् जेनेटिक्स किंवा सायकोलॉजी घेऊन एम.एस्सी. करू शकतात. एम.एस्सी. क्लायमेट किंवा पर्यावरण यासारखे वेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला आवड असल्यास बोटीवर खलाशी म्हणूनही जाऊ शकता.

याखेरीज जाहिरात, कला, फोटोग्राफी, डिझायनिंग, कार डिझायनिंग, पत्रकारिता, कलाशाखा, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारखे करिअरचे वेगळे पर्याय आहेतच. ऑल द बेस्ट!

- किरण जोग
(लेखक करिअर कौन्सेलर आहेत)
 

??? ???????? ???????

Unknown 0 comments
काय म्हणतायत टॉपर्स?

 
 
दहावीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे! आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्
पा ओलांडतानाचा त्यांच्या यशाचा फंडा आणि पुढच्या महत्त्वाकांक्षा, याविषयी त्यांच्याच शब्दांत...

* अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचेय
९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळतील, असे वाटत होतेच परंतु, मुंबईतून पहिला क्रमांक आल्यावर मात्र, आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यशाचे मानकरी शिक्षक, आई-वडील आणि आजी आहे. मला चौथी आणि सातवीची स्कॉलरशीप, होमी भाभा सायन्स टॅलेन्ट हंट स्पधेर्तल्या ज्युनिअर्सच्या गटात सुवर्ण तर सिनिअर्सच्या गटात रौप्यपदक मिळाले आहे. अकरावीसाठी मी ठाण्याच्याच एम. एच. हायस्कूलला प्रवेश घेणार आहे. नंतर आयआयटीला अॅडमिशन घेऊन मला अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचे आहे.
- सोनाली चव्हाण, (९६.४६ टक्के) सरस्वती सेकंडरी, ठाणे, मुंबई विभागातून पहिली

* ध्यास इंजिनीअरिंग, आयएएसचा
दहावीच्या परीक्षेचे टेंन्शन न घेता मी नियोजन करून अभ्यास केला. वर्षभर शाळेतील स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेत खूप मजा केली. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्पेशल बॅचेसमुळे हे यश मिळाले. मला भरतनाट्यमची आवड आहे. मला मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आयआयटीतून इंजिनीअर व्हायचे आहे. नंतर आयएएसही करायचे आहे.
- शेफाली माडदोळकर,(९६.३०) सरस्वती विद्यालय, ठाणे, मुंबई विभागातून दुसरी

* मेडिकलपेक्षा इंजिनीअरिंग आवडते
माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर, तर आई आणि मोठा भाऊ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर त्यामुळे मलाही इंजिनीअर व्हायचे आहे. मला बायोलॉजी विषय आवडत नसल्याने मेडिकलला जाण्यापेक्षा कॉम्प्युटर इंजिनीअर व्हायला आवडेल. माझ्या यशाचे श्रेय शाळेतले शिक्षक, कुटुंबियांना द्यायला हवे. मला अभ्यासात रमायला आवडते, पण चित्रकला, हस्तकलेचेही वेड आहे. सातवीत स्कॉलरशीप मिळाली होती. काही महिन्यांपूवीर् शाळेकडून 'बेस्ट गर्ल' ट्रॉफी मिळाली. मला एम. एच. हायस्कूलला प्रवेश घ्यायचा आहे.
- तेजल प्रधान, (९६.१५) ए. जे. जोशी, ठाणे, मुंबई विभागातून तिसरी

* वेळापत्रक तंतोतंत पाळले
वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेचे ओझे वाटले नाही. वडिलांनी तयार केलेले दिवसभराचे वेळापत्रक, खासगी ट्यूशनमध्ये घेतलेला सततचा सराव आणि शाळेतील शिक्षकांचे मागदर्शन या त्रिसुत्रीमुळे हे यश मिळाले. कंटाळा येऊ नये म्हणून दररोज वेळापत्रक बदलले जात होते. आता पुढे इंजिनीअरिंग करायचे आहे.
- मृण्मयी जाधव, (९६.१५) सुळे गुरूजी विद्यालय,
हिंदू कॉलनी, मुलींमध्ये तिसरी व शाळेत पहिली.

* यश अभ्यासावर ठरते, शाळेवर नाही!
दोन वर्षापूवीर् आम्ही कल्याणहून माहीमला आलो. दादर, माहीम भागांतील एकाही शाळेत प्रवेश न मिळाल्याने रात्रशाळेचा पर्याय निवडला. रात्रशाळेत चांगले शिक्षण मिळत नाही, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शाळा चांगली किंवा वाईट नसते. आपण अभ्यास कसा करतो, यावर बरेच अवलंबून असते. संध्याकाळी सातला शाळा सुटल्यानंतर रात्री थोडा वेळ अभ्यास, पहाटेच्या वेळी तीन तास नियमित अभ्यास, असे माझे अभ्यासाचे वेळापत्रक होते. हायकोर्टात अॅडव्होकेट असलेल्या वडिलांची आणि रात्रशाळेतील शिक्षकांची साथ मिळाल्यामुळेच हे यश मिळवू शकले. मला कम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलमध्ये करिअर करायचे आहे. चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊन आता सीईटी आणि बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंदित करायचे आहे.
- सोनल सिंग, (८४.१५) कनोसा नाईट हायस्कूल, रात्रशाळेत राज्यातून पहिली

* स्वप्न आयआयटी इंजिनीअर होण्याचे
दहावीचा उगाचच बाऊ केला जातो. नियमित अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. अभ्यासातील सातत्य मात्र कमी होऊ न दिल्यास यश तुमचेच आहे. मला वाचनाची आवड आहे. परीक्षेच्या काळात आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. मी सुरुवातीला दोन-तीन तास अभ्यास करायचो, मात्र नंतर हा वेळ वाढवत गेलो व खेळाचा वेळ कमी करीत गेलो. खेळात कधी खंड पडू दिला नाही. मला आयआयटी इंजिनीअर व्हायचे आहे.
- संकेत पाटील, (९६.३०) सेंट अँथनी काँन्व्हेंट, वसई, मुंबई विभागातून दुसरा

* आता आयआयटी, मग आयएएस!
वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे नियोजन केले होते. सुरुवातीला एक दोन तास अभ्यास सुरू होता. मग, पाच-सहा तास आणि नंतर दहा ते बारा तास. क्रिकेट सामने पाहिले, पण टीव्हीमुळे डोळ्यांवर ताण पडू नये म्हणून मालिका आणि मनोरंजाचे सर्व कार्यक्रम बंद होते. मोटारींचे फोटो जमवण्याचा मला छंद आहे. या यशाचे सर्व श्रेय आई वडिल व कोचिंग क्लासला आहे. भविष्यात आयआयटीतून सिव्हिल इंजिनीअरिंग करून पुढे आयएएस व्हायचे आहे. खूप मेहनत करून फोटोतली रोल्सरॉइस फँटम विकत घेण्याचे स्वप्न आहे.
- नवनीत मेहरोल, (९४.६१) सुळे गुरुजी विद्यालय, अपंगांमध्ये पहिला.

* पप्पांचे स्वप्न साकार करायचेय
डोळ्यांत अश्ाू असतील तर पुढचा मार्ग नीट दिसत नाही. त्यामुळे अश्ाू पुसून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंदित करावे, असे पप्पा नेहमी सांगत. दहशतवाद्यांशी लढताना पप्पा शहीद झाल्यानंतर या शिकवणीचे अनुकरण करणे खूप अवघड होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी मी अभ्यासावर लक्ष केंदित केले. दहावीतील हे यश वडिलांच्या त्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आता डॉक्टर होऊन त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे. सांत्वन करण्यासाठी घरी लोकांची सतत ये-जा होती. त्यामुळे शेजाऱ्यांच्या घरी बसून अभ्यास केला. आई आणि बहिणीसोबतच मला शाळेतील शिक्षकांचे पाठबळ मिळाले. हा आनंदाचा क्षण पाहायला पप्पा नाहीत, याची मात्र खंत वाटते.
- निवेदिता शशांक शिंदे, (८६) प्रभादेवी कॉन्व्हेंट र्गल्स हायस्कूल

* अभ्यास-आहाराचे वेळापत्रक सांभाळा
क्लास-शाळा-क्लास आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, असे माझे वेळापत्रक होते. या वेळा सांभाळताना माझे आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष झाल्याने परीक्षा महिन्याभरावर आली असताना सारखी झोप यायची. त्यामुळे अभ्यासात व्यत्यय यायचा. मग मी वेळापत्रक बदललेे. प्रिलिम्समध्ये ९४ टक्के मिळाले तेव्हाच ९५ टक्क्यांच्या पुढे जाण्याचा निश्चय केला होता. या यशात माझ्या खाण्याचे वेळापत्रक पाळणारी आई, अभ्यास करताना माझ्याबरोबर उशिरापर्यंत जागणारे बाबा, धाकटा भाऊ आणि शाळा-क्लासमधील शिक्षकांचा वाटा आहे. मी फक्त अभ्यास एके अभ्यास करायचे, बाकीच्या गोष्टी या सगळ्यांनी सांभाळल्या. शाळेतील एक व्हॉलीबॉलची मॅच सोडली तर मनोरंजनाच्या सगळ्या माध्यमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. जानेवारीत शाळा बंद झाल्यानंतरचा अखंड दिवस क्लास आणि घरी अभ्यास करण्यातच जायचा.
- अंजली जाधव, (९५.८४), अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल,
गोरेगाव, मुंबईत मागासवगीर्यातून प्रथम
 
 

congrats " priti ramchandra sutar "

Unknown 0 comments
hi friends.....

congrats for all studetnts who success in SSC & HSC exams..... & wish all for best career & future

one good news...

ms. " priti ramchandra sutar " from kardinal pimenta adivasi highschool varkhanda
secure 93.53% in SSC.

this is gr8 news for all..... we can show our ability to world in this way now onwards & we will compete without any limit.

wish her all the best priti for your career & future

jai adivasi shakti!

????????? ????????

Unknown 0 comments
दहावीनंतर शाखानिवड

या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि 'घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले असतात. यामध्ये विषयाचे आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही

दहावीचा निकाल २५ जूनला लागला आहे. आता विद्यार्थी व पालक या दोघांपुढे एक महत्त्वाचा प्रश्‍न उभा आहे, तो म्हणजे पुढे अभ्यास शाखा कोणती निवडावी? अनेकदा किती गुण मिळालेत यावर हा निर्णय ठरवला जातो. आजही ठोकताळ्याने ७०-७५ टक्‍क्‍यांवर गुण मिळाले, की विज्ञान वाणिज्य कॉमर्स शाखा-त्याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, की कला शाखा अशा प्रकारे निवडप्रक्रिया होते. यामध्ये बरोबरीचे मित्र/मैत्रिणी कोठे जाणार, हासुद्धा महत्त्वाचा भाग होतो. अनेकदा समाज किंवा पालकांच्या दडपणामुळे ही निर्णय होतो. उदा. एखाद्या ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीने कला किंवा गृहविज्ञान अभ्यासक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला तर तिला वेड्यात काढले जाते आणि इतके चांगले गुण आहेत तर विज्ञान किंवा वाणिज्यला जा, असं दडपण निर्माण केलं जातं. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि "घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले
 

mumbai aani marathi

Saturday, June 20, 2009 Unknown 0 comments











































































































































'ती'ची गोष्ट...

Tuesday, June 16, 2009 Unknown 0 comments



मुलगाच मुलीच्या घरी लग्नानंतर मुलगाच मुलीच्या घरी राहायला आला तर? म्हणजे घरजावई म्हणून नव्हे, तर समाजातली- सर्व घरांमधली रीत म्हणून. मुलीचं घर, तिची माणसं, तिचं आयुष्य आहे तसंच पुढे चालू राहणार. किती छान कल्पना वाटते ना?

गंमत म्हणजे ही काही नुसतीच कल्पना नाही तर प्रत्यक्ष तसं घडतंही आहे.

नुकतीच मी 'मेघालय'मध्ये जाऊन आले. नुसते पर्यटक म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित सगळं अनुभवायला नाही मिळणार. पण मला 'जोवाई' या गावामध्ये तिथल्या कुटुंबात राहता आलं. आई- तिची मुलगी आणि मुलीची मुलगी असं एकत्र नांदतं घर मी अनुभवलं.

नवराच लग्नाननंतर मुलीकडे राहायला येतो. तीन-चार बहिणी असतील तर आईच्या घराशेजारी घर बांधून त्या राहतात आणि सर्वांत धाकटी मुलगी तिच्या नवऱ्यासह आई-वडिलांकडेच राहते.

याला मातृसत्ताक पद्धती असं सरसकट म्हणू नका, ही आहे 'मातृवारस' पद्धत. म्हणजे मातृ'सत्ता' नाही पण वारसा मात्र आईकडून मुलीकडे जातो. कुटुंबप्रमुख नवराच असतो पण उत्सव, सण, धार्मिक विधी यामध्ये महत्त्व असतं घरच्या स्त्रीला आणि तिच्या मामाला किंवा भावाला. कसलं छान वाटत होतं त्या कुटुंबात राहताना.

मोठे सण - समारंभ वगळता सासू-सुनेचा संबंधच नाही. सून राहणार आपल्या आईजवळ आणि सासू राहणार तिच्या मुलीजवळ. म्हणजे भांड्याला भांडं लागायचा प्रश्‍नच नाही. भांडण नाही, इगो क्‍लॅश नाही. नवऱ्याची दोन्हीकडून होणारी रस्सीखेच नाही.

या सगळ्यावर कडी करणारी आणखी एक गोष्ट. ती म्हणजे नवरा राहतो बायकोकडे आणि जेवायला मात्र जातो आपल्या आईकडे. म्हणजे नवऱ्यासाठी स्वयंपाक करायचीही भानगड नाही. 'बाई आणि तिची मुलं' हेच नातं केंद्रस्थानी.

आदिवासी कुटुंबामधून आलेली ही परंपरा. पण आज ही कुटुंबं चांगली सुस्थितीमध्ये आहेत.शिकलेली आहेत. आम्ही राहात होतो त्या कुटुंबामधली मुख्य स्त्री कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापक होती. अस्खलित इंग्रजी बोलत होती.

बदलत्या काळानुसार मातृवारस पद्धतीत काही ठिकाणी बदल होत आहेत. पण मेघालयात प्रामुख्याने ही पद्धत टिकून आहे.

मैत्रिणींनो, मग वाटतंय ना की महाराष्ट्रात फुकट इतकी वर्षं काढली म्हणून? की इथे आणायचा ठरवताय मेघालयातला मुलगा लग्न करून?

original at - http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=a24dafcc-b2f8-40f1-98ce-30efba4a908d&SID=742


updation in progress