Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)

Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

AYUSHonline

AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in

सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती

Saturday, October 22, 2011 AYUSH | Adivasi Yuva Shakti

सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती
सुसरी नदीवर धरण होऊ देणार नाही, होवू देणार नाही
जाहीर सभा
ठिकाण कासा केंद्र दिनांक ९ ओक्ट २०११ रोजी सकाळी १० वाजता
सुसरी नदीवर नियोजित धरण प्रस्थावित आहे. या धारणा मुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी , दहीगाव, ओसुर, असरविरा, नवनाथ आणि गनेशबाग (रानशेत) येथील आदिवासींच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या धरणातील ५४ दश लक्ष घनमीटर पाणी पाईप लाईन द्वारे वसई, विरार व नवघर माणिकपूर व नालासोपाऱ्याला नेण्यात येणार आहे. या धरणाला आमचा प्रखर विरोध आहे. आजवर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा सारख्या प्रकल्प द्वारा मुंबई ला पाणी नेण्यात येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाण्याची लुट करण्यात आलेली असून तेथील प्रकल्प ग्रास्तांचे पुनवर्सन झालेले नाही आणि आता मुंबई उपनगरे या भागात राहिलेल्या पाण्याची साधने हडप करू पाहत आहे. यातून आदिवासी साठी काहीही शिल्लक राहणार नाही.
म्हणूनच आतापर्यंत झाले इतके पुरे झाले, असे सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. या पुढे आदिवासी नियोजनहित नागरीकरणाचा बोजा सहन करणार नाही. दूरवर आदिवासी भागात धरण बांधण्या एवजी वसई तालुक्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर करायला हवा. सिडकोने या साठी कामन, खोळ्सा पाडा, उसगाव, सातिवली, इत्यादी जागा सुचविल्या असून या ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर केला गेल्यास. दर दिवशी १२४ एम एल डी एव्हडे पाणी उपलब्ध होवू शकेल असे म्हटले आहे. सुसरी धरणात मिळणाऱ्या पाण्या पेक्षा हे मिळणारे पाणी किती तरी पटीने अधिक असेल या खेरीज पाईप लाईन तसेच बांधकाम खर्चाचीही बचत होवू शकेल. मात्र ठेकेदारांच्या लॉबीला बळी पडत सरकारने या सुचणे कडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या भागातील काही राजकारणी लोकांनी आदिवासी कल्याणाचा विचार करण्या एवजी या धरणाचे समर्थन करत स्वतःची तुंबडी भरण्याच्या उद्देशाने मागे लागले आहेत.
आमच्या नद्याचे पाणी आमच्या मालकीचे आहे त्याच्या वापरावर आमचा अधिकार आहे आम्हालाच जर पिण्या साठी पाणी नाही तर आम्ही येथील पाणी वसई विरार ला का पाठवावे ? आणि त्यात तर शहराच्या मागण्या रोज वाढत आहेत. तसेच शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. शहराच्या नवीन वसाहतींच्या गरजा भागवण्य साठी अधिका अधिक धरणे बांधली जातील. वसई विरार मधली बिल्डर लॉबीने चालविल्या नियोजनशून्य आणि अनिर्बंधित वाढीमुळे येथे पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी आदिवासींची शेती फुलाविन्या साठी दिले जाणार होते परंतु ठेकेदारांनी पद्धतशीर पणे वसई विरार सारख्या योजना मधून हे पाणी अन्यत्र कसे वळवता येयील हे काम केले आहे. आदिवासी भागाचे वसाहतीकरण आणि त्यांचे पाणी इत्तर साधनांनी लुट या पुढे थांबवा असे सरकारला सांगण्यासाठी कासा येथे एकत्र जमायचे आहे.
सुसरी धरण विरोध संघर्ष समिती
अध्यक्ष : श्री नरेश हाल्या बोलाडा
उपधक्ष्य : श्री चंदू सोनू वरठा
सचिव : श्री देविदास नंदकुमार तल्हा
खजिनदार : श्री सुरेश बाबू कडू

0 comments: सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती

Post a Comment

updation in progress