'बे एके बे' म्हणत घोकंपट्टी करत परंपरागत व्यवस्थेला धक्का न देता त्याच त्या चाकोरीभोवती फिरणाऱ्या शिक्षण पद्धत
ीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणारी पिढी पूवीर् भांबावलेली असायची. वास्तवतेची जाण आल्यावर आपण नक्की इतकी वषेर् काय शिकलो, याचे पुनरावलोकन करत बसायची. तेव्हा त्यांच्या ध्यानात यायचं की, हे सर्व पुस्तकी होतं. खरं जग निराळंच आहे. मग वास्तव जगाची ओळख सुरू व्हायची. तोपर्यंत बराचसा काळ निघून जायचा...ही परिस्थिती आता बदललीय. फास्ट फूडच्या या जगात शिक्षणही तसंच झालंय. स्पधेर्च्या वर्तुळात राहाताना बदलाच्या वाऱ्यांना समाजावून घेऊन तावूनसुलाखून यशाच्या शिखरावर पोहोचणारी नवी पिढी उदयास आली आहे. त्याला कारण शिक्षणाचे बदललेले स्वरूप!
जागतिक स्पधेर्च्या या युगात येणाऱ्या समस्यांना तोंड देणारं, कल्पनांना मूर्त स्वरूप देणारं शिक्षण आता अपेक्षित आहे. त्या अपेक्षांची पूतीर् करणारे अनेकविध अभ्यासक्रम निर्माण होऊ लागले आहेत. परंपरागत शिक्षण पद्धतीला छेद देऊन नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भक्कम मनोधैर्य आणि व्यापक कल्पनादृष्टी असलेले विद्याथीर् सध्याच्या शिक्षणपद्धतीतून घडताना दिसतात. पूवीर् दहावी, बारावी, पदवी आणि त्यानंतर ठराविक अभ्यासक्रम असायचे. ते पूर्ण करून स्वप्न पूर्ण केलं जायचं. आता येणारी प्रत्येक पहाट काहीतरी नवीन घेऊन येत असल्यानं त्या नव्याशी जुळवून घेणारे अभ्यासक्रम येऊ लागलेत.
महाराष्ट्राचा विचार केला, तर ज्ञानाची ही गंगोत्री विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवण्यासाठी अनेक विद्यापीठे आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात विविध विद्यापीठे सुरू करून प्रत्येकाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ यांचा उल्लेख करावा लागतो. या विद्यापीठांशिवाय कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी देणारी तसेच अन्नधान्याची, फळेफुलांची कमतरता राहू न देण्यासाठी संशोधनाचे काम करणारी कोकण कृषी विद्यीपीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठेही आहेत. बदलणाऱ्या समाजव्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करणारी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांद्वारे वेगळ्या क्षेत्रात तरुणांना काम करता येते. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय ही भाषांच्या बदलत्या प्रवाहांची ओळख करून देणारी विद्यापीठेही आहेत. आयआयटीद्वारे संशोधनाच्या विश्वात विद्यार्थ्यांना काम करता येते. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठही आहे.
या विद्यापीठांबरोबरच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक यासाठी असणाऱ्या प्रचलित कोसेर्ससह सध्याच्या काळात नवनवीन कोसेर्सद्वारे करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. एमबीए, ट्यूरिझमच्या क्षेत्रात अनेक कोसेर्स असून ते पूर्ण करून करिअर घडवता येते. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात एरॉनॉटिकल इंजिनियरिंगला जास्त महत्त्व आले आहे. अॅव्हिएशन कोसेर्सलाही तरुणांची पसंती मिळत आहे. त्यामध्ये फ्लॉईंग ऑपरेशन, एअरक्राफ्ट मेंटेनन्स हे कोर्स आहेत. बँकिंग क्षेत्रात होणारी उलाढाल लक्षात घेता या क्षेत्राला आवश्यक असणारे ज्ञान दिले जाऊ लागले आहे. त्यामध्ये मर्चंड बँकिंग, ट्रेझरी मॅनेजमेंट, मायक्रो अॅण्ड डेव्हलपमेंट फायनान्स, माकेर्टिंग, ह्युुमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स यांचा समावेश आहे.
बिझनेस प्रोसेस आऊटसोसिर्ंगची (बीपीओ) सध्या चलती आहे. त्यासाठी संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय फॅशन डिझाइन, मॉडेलिंग, इंटेरियल डिझाइन, टेक्सटाइल टेक्नॉलॉजी, टेक्सटाइल डिझाइन, फूटवेअर डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन हे कोसेर्स करिअरचे मार्ग खुले करून देऊ लागले आहेत.
- सुजित तांबडे
0 comments: घोकंपट्टी ते आयटीबीटी फास्ट फॉर्वर्ड
Post a Comment